पतसंस्थेचे स्थापनेपासूनचे एक लक्ष्य म्हणजे आम्ही आमच्या सेवेत कमी पडणार नाही हे सुनिश्चित करणे. सतत चांगल्या सेवेसाठी प्रयत्न करणे, प्रगतीचा आलेख कितीही मोठा झाला तरीही मूळ उद्देशापासून विचलित न होता गरजू लोकांना कर्ज देताना ग्रामीण भागातील बांधवांना प्राधान्य देण्याचे धोरण स्थापनेपासून आहे.
"सब समाज को लिये साथ में, आगे है बढते जाना "
प्रत्येक संस्थेने प्रगती केली पाहिजे. बँकिंग क्षेत्र याला अपवाद नाही. सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना आर्थिक सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवाव्या लागतात. संस्थेचा व्यवसाय वाढवणे हे एक अत्यंत महत्त्वाचे कार्य असले तरी या स्पर्धेच्या शर्यतीत संस्था संस्काराचा 'पाथेय' घेऊन पुढे जात आहे. संस्थेने सीबीएस बँकिंग प्रणालीचा अवलंब केला आहे आणि एसएमएस, मोबाइल बँकिंग, मिस कॉल अलर्ट, एनईएफटी/आरटीजीएस यासारख्या सेवा संस्थेने सुरु केलेल्या असून भविष्यात उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्याच्या आशेने संस्थेचे प्रयत्न सुरु आहेत.
अध्यक्ष
उपाध्यक्ष
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालक
संचालिका
संचालिका
कार्यलक्षी संचालक